लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने...
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने...
जरा पाणीया डोळ्याने अन्...जरा हासऱ्या चेहऱ्याने....!
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने...
चेहऱ्यावरती क्षमस्व घेऊन दारी उभा मी थकलेला....
आणि तुझा चेहरा जणू की चंद्र घनातुन लपलेला.....
सोळा साऱ्या कळा जागतील...सोळा साऱ्या कळा जागतील....अवघ्या एका खोडीने......
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने..
किणण हलावा लोलक हलके...नेत्रांमधला ओझरता...
पुन्हा राहशील दूर उभी तू पूर आतला ओसरता....
वेड लावुनी रुसशील म्हणशील......"वाट पाहिली वेडीने..."
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....
संदर्भांचे अर्धे गाणे आता व्हायचे घे पुरते...
ना रहायचे पुन्हा निमंत्रण गाव व्हायचे गजबजते...
सांधायाचा पुनःश्च सेतू...जोडीने तडजोडीने.....
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....
ऊन सावली मिठीत येईल...दिठित येईल जाग नवी..
जागी होईल तुझ्यात कविता...आणिक माझ्यातील कवी.....
गोष्ट सुरु ही रुष्ट परंतु.....संपायची गोडीने.....
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....
जरा पाणीया डोळ्याने अन्...जरा हासऱ्या चेहऱ्याने
-
-संदीप खरे
Monday, March 26, 2012
Friday, March 16, 2012
डहाळी
ही डहाळी ठेवून जातो तुझ्यासाठी
जेव्हा लगडून येतील फुलं याच्यावरती
अन आयुष्याची रेषा होईल हिरवीगार
तेव्हा मी नसेन कदाचीत पण जाणवेल तुला
हा माझाच गंध आहे हा आहे माझाच बहार...
मातीपाण्यावाचूनही राहील ती डहाळी
ती लागली आहे कुण्या काळी माझ्या आत
डोळ्यांना दिसणाऱ्या पावसाची गरज नाही तिला
तिची सारी हयात गेलीय रणरणत्या उन्हात
अगदी राजवर्खी फुलांची नव्हेच ती डहाळी
पण इतकी साधीही नव्हे की फुलंच येणार नाहीत
प्रत्येक गोष्टीची चिमणे यावी लागते वेळ
तीच तेवढी नव्हती बघ या जन्माच्या हद्दीत
सारा जन्म गेला बापाचा ढगांच्या सावल्या मोजण्यात
कुणीही विचारलं तरी बेलाशक सांग
असे निरूद्योगही करावे लागतात कुणीतरी
कधीतरी सोडावीच लागते मेंढरांची रांग
बहरलेलीच द्यायची होती ही डहाळी तुला
माहीत नव्हते आशेपेक्षा श्वास छोटे पडतील
हरकत नाही हेही बरेच! तुला तरी आता
दोन्ही ऋतू निट निरखून पारखून घेता येतील
झोपून घे थोडी अजून उजाडायला वेळ आहे
उद्या चिमणे आहेच तुला तुझा तुझा प्रवास
तुला तरी दिसोत फुलं या डहाळीच्या हक्काची
या शब्दांहून काही नाही जवळ तेव्हा तूर्तास
...ही डहाळी ठेवून जातो तुझ्यासाठी
-संदीप खरे
जेव्हा लगडून येतील फुलं याच्यावरती
अन आयुष्याची रेषा होईल हिरवीगार
तेव्हा मी नसेन कदाचीत पण जाणवेल तुला
हा माझाच गंध आहे हा आहे माझाच बहार...
मातीपाण्यावाचूनही राहील ती डहाळी
ती लागली आहे कुण्या काळी माझ्या आत
डोळ्यांना दिसणाऱ्या पावसाची गरज नाही तिला
तिची सारी हयात गेलीय रणरणत्या उन्हात
अगदी राजवर्खी फुलांची नव्हेच ती डहाळी
पण इतकी साधीही नव्हे की फुलंच येणार नाहीत
प्रत्येक गोष्टीची चिमणे यावी लागते वेळ
तीच तेवढी नव्हती बघ या जन्माच्या हद्दीत
सारा जन्म गेला बापाचा ढगांच्या सावल्या मोजण्यात
कुणीही विचारलं तरी बेलाशक सांग
असे निरूद्योगही करावे लागतात कुणीतरी
कधीतरी सोडावीच लागते मेंढरांची रांग
बहरलेलीच द्यायची होती ही डहाळी तुला
माहीत नव्हते आशेपेक्षा श्वास छोटे पडतील
हरकत नाही हेही बरेच! तुला तरी आता
दोन्ही ऋतू निट निरखून पारखून घेता येतील
झोपून घे थोडी अजून उजाडायला वेळ आहे
उद्या चिमणे आहेच तुला तुझा तुझा प्रवास
तुला तरी दिसोत फुलं या डहाळीच्या हक्काची
या शब्दांहून काही नाही जवळ तेव्हा तूर्तास
...ही डहाळी ठेवून जातो तुझ्यासाठी
-संदीप खरे
Friday, March 9, 2012
आता वाटतं
आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला
आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला
एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस
आता वाटतं – नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला
आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ,
कसे सचैल भिजायचो इतके दिवस – मजा वाटते आहे !
काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा
अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे …
आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला
थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही
आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास
प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही !
भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो – क्षमा !
बहरून आला होतात त्या उद्यानांनो – क्षमा !
झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात
पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे !
पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो
यावर आता विश्वास ठेवायचा फक्त …
हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे
थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं,
आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त !
-संदीप खरे
आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला
एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस
आता वाटतं – नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला
आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ,
कसे सचैल भिजायचो इतके दिवस – मजा वाटते आहे !
काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा
अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे …
आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला
थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही
आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास
प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही !
भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो – क्षमा !
बहरून आला होतात त्या उद्यानांनो – क्षमा !
झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात
पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे !
पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो
यावर आता विश्वास ठेवायचा फक्त …
हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे
थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं,
आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त !
-संदीप खरे