Saturday, December 31, 2011

ये ना

बंद तटांशी या लाटांशी कधी थांबती पाय
पश्चिम वा-यावरती मज हे ऐकू येते काय
जीव भाबडा जगावेगळा बोलू गेला काय
जन्म मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय
तुझ्या वीजेचे दान माझिया मातीला देना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

जरीही बघतो विसरून तुजला तरीही का ऐसे
नभास म्हणतो जमीन आणिक जमीन जळ भासे
कैफ तुझ्या स्मरणांचा कैसा अजून उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

खिन्न काजळी जरीही चमके आतून रुधिराशी
लखलख ओळी तुझीयावरच्या येती अधराशी
जन्म हारलो पणास याचे इमान उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

तुला ऐकू दे तुला स्पर्शू दे तुला पाहू दे ना
हिशोब पापा - पुण्याचे हे ज़रा राहू दे ना
क्षणापायी हा शाप युगांचा मला झेलू दे ना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

-संदीप खरे

Wednesday, December 28, 2011

नाजुक

इतकी नाजुक इतकी अल्लद
फुलपाखराहून अलवार
चालू बघता नकळत होते
वाऱ्यावरती अलगद स्वार इतकी नाजुक…...

निजल्या देही गवाक्षातुनी चंद्र
किरण ते पड़ता चार
लक्ख गोरटी रापून झाली
रात्रीत एका सावळ नार इतकी नाजुक……

इतकी नाजूक जरा तिचे मी
जोर देऊनी लिहिता नाव
दावीत आली दुसऱ्या दिवशी
अंगा अंगावर हळवे घाव इतकी नाजुक……

कशा क्रूर देवाने दिधल्या
नाजूकतेच्या कला तिला
जरा जलदसा श्वास धावता
त्यांच्या देखिल ज़ला तुला इतकी नाजुक……

इतकी नाजुक इतकी सुंदर
दर्पण देखील खुळावतो
ती गेल्यावरही तो क्षणभर
प्रतिबिंबाला धरु बघतो इतकी नाजुक……

इतकी नाजुक की जेव्हा
ती पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारण जळात
साखर क्षणात विरघळते इतकी नाजुक……

इतकी नाजुक की आता तर
तर स्मरणाचेही भय वाटे
नको रुताया फुलास असल्या
माझ्या जगण्यातील काटे इतकी नाजुक……

-संदीप खरे

Friday, December 23, 2011

आज मी आयुष्य माझे

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

-संदीप खरे

Wednesday, December 21, 2011

कसा चंद्र

कसा चंद्र! कसं वय !
कशी तुझी चांदण सय !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

अंगामध्ये भिनत्येय वीज !
नाही जाग,नाही नीज !
दंव पडतंय शब्दांवर,
धुकं येतंय अर्थावर !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

उभा आहे मस्त खुशाल !
अंगावर थंडीची शाल !
गुलाब तिच्या गालांवर,
काटा माझ्या अंगावर !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

कशी मजा झाल्येय आज
शांततेची सुद्धा गाज !
फुटतंय सरं आतल्याआत !
जंतरमंतर झाल्येय रात !!
कसा निघेल इथुन पाय?
वेड लागेल नाहीतर काय !

कशी झुळूक हलकीशी...!
कशी हवा सलगीची...!
कसा गंध वाऱ्यावर !
राहील मन थाऱ्यावर ?!
कसा निघेल इथुन पाय?
वेड लागेल नाहीतर काय !

रात्र बोलत्येय ताऱ्याशी;
पहाट उभी दाराशी !
गूज आलंय ओठांशी
पण बोलावं तरी कोणाशी...?
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

चंद्र असा झरझरतोय...
अबोलाही दरवळतोय...
मला आलाय अर्थ नवा;
तिला ऐकु जायला हवा !!
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

तुजवरी लावला जीव
हे मुळात चुकले माझे,
मी पाऊस हुडकायाला
ग्रिष्माच्या गावा शिरलो...........................

- संदीप खरे

Friday, December 9, 2011

बारीश

बारीश से अक्सर मिला करता था मैं
बारीश से अक्सर मिला करता था मैं
और तुमसे भी कभी कबार...

इत्तेफाकन् मगर तीनों इकठ्ठा कभी नही मिले हैं हम
इत्तेफाकन् मगर तीनों इकठ्ठा कभी नही मिले हैं हम

मिन्नते तो बहुत की थी मैने
बारीश से भी, तुमसे भी... मगर खैर...

अब की बार थान ली है मैने
तुम दोनों को साथ साथ ही मिलने की
अब की बार थान ली है मैने
तुम दोनों को साथ साथ ही मिलने की

इसिलिये अब आँखोमेंही बारीश लिये घूमता हूँ मैं...
उन्ही गलियों में...

जहाँ इत्तेफाकन् कभी तुम मिल जाओ शायद...
मिल जाओ शायद...

-संदीप खरे

Thursday, December 1, 2011

किती ?- एक जनरल छापील फॉर्म

तू आवडतोस/तेस
तू खूप आवडतोस/तेस
तू प्रचंड आवडतोस/तेस
तू सॉलीड आवडतोस/तेस
तू अफाट आवडतोस/तेस
तुझ्यावाचून जगणे नाही इतका/की आवडतोस/तेस
श्वास घेणं शक्य नाही इतका/की आवडतोस/तेस
तू नसशील तर नसेन मी ही इतका/की आवडतोस/तेस

तो/ती खपून आता वर्ष होईल अवघं दीड
पण अजूनही आवडतंच त्याला/तिला
वाडीलालचं चॉकलेट आईस्क्रीम,
ब्राऊन शेडेड शर्ट/साड्या,
सनसेट, भीमसेन, पिकासो, परफ्युम्स...
आणिक हो !
आताशा ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस कलीगची कंपनीही
एक कप कॉफीसाठी (?)...
’तो’/’ती’ असली म्हणजे मन थोडं हलकं होतं...यू नोऽऽ

’तो’/’ती’ आवडतो/ते
’तो’/’ती’ खूप आवडतो/ते
’तो’/’ती’ चिकार आवडतो/ते
...तुझ्यावाचून जगणे नाही...
...श्वास घेणं शक्य नाही...
...तू नसशील तर नसेन मी ही...
.................वगैरे.....

-संदीप खरे

Wednesday, November 30, 2011

समुद्राकाठच्या कविता

-१
हा समुद्र...
हजार लाटांनी समजावतो आहे या तटाला
तरीही त्याचे ’जमिनपण’
प्रत्येक लाटेला ओसरवताना
रंगीतच होते आहे अधिकाधिक......!

-२
बदलते,मावळते रंग
गोंदवून घेण्याचा
मनस्वी छंद या वाळूला
खूप जुना !

-३
त्या मावळत्या तांबड्या टिकलीला
हे कपाळ रोजचेच...
युगानुयुगांचे अभंग पातिव्रत्य !

-४
दूरवर विरघळते आहे
आणखी एक संध्याकाळ
समुद्राच्या पाण्यात...
...तू कुठे आहेस, प्रिय ?
बघ, हे जीवघेणे विरघळणे ......

-५
खूप वरचे स्वर लागताहेत आज
अचूक आणि भिजलेले...
त्यात हा समुद्राचा अखंड खर्ज...
असेच गाणे येईल ?

-६
जायची वेळ ! वारा सुटलाय...
माझी परतती पावलंही
त्रयस्थपणे पुसतो आहे हा समुद्र !
दुसऱ्याला रडवणारी
कसली ही स्थितप्रज्ञता......प्रिय ?

-७
मी नसेन
तेव्हाचा समुद्र पाहायचा आहे......

-८
मी नसताना
खडकांच्या गळ्यात हात टाकून
उदास ह्सत असेल हा...
...असेल ना, प्रिय ?.......

-९
येतो...साऱ्यांनो...येतो...

-१०
...हुरहुर...
...लाटेगणिक...
...लाटाभर...

-संदीप खरे

Thursday, November 24, 2011

हरकत नाही

"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

- संदीप खरे

Thursday, November 17, 2011

चौथी भिंत

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे...
मी म्हटलं - ’चंचल असतात !’
तू म्हटलंस - "आपल्याला हवेत !!"
मग छाती फुटून धावलो...धावावंच लागतं...
हातातून हात सुटून जातात, दु:ख त्याचं असतं...

कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं...
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार ’का?’ ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?

तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस...
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही......

मी ही धावायचो वार्‍यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठी...माझ्याही घराला नव्हत्या भिंती...
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !

चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही...
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही......

अगंss भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

-संदीप खरे

Sunday, November 13, 2011

डोंगळ्याचं जीणं !

"तुझ्याकडे तर दिसत नाही एखादीही डिग्री..."
पारावरच्या डोंगळ्याला मी विचारले -
"...आणि तरीही चांगला गलेलठ्ठ जगतो आहेस..."

तो थबकला
कसनुसं म्हणाला -
"छे ! आमचं कसलं आलंय...डोंगळ्याचं जीणं !"

"नाहीतरी काय एवढा फरक आहे ?"
मी म्हणालो...
आणि डोंगळ्यासारखा तुरूतुरू पुढे निघालो......

-संदीप खरे

Tuesday, October 11, 2011

दोघे नकळते

...ती म्हटली - ’ते आलेच ओघाओघाने...’
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ’तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...’
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ’कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !’
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !!".......

-संदीप खरे

Wednesday, October 5, 2011

धैर्य

जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......

जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ’चाचपत’ राहते,
सध्या तिच्या असलेल्या हातांनी’
सध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापऱ्या कापऱ्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

- संदीप खरे

Saturday, October 1, 2011

सफरचंद

सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-‍‍ना पिकल्याची
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल‍‍-बिबेल मागायचे नसते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

-संदीप खरे

Thursday, September 1, 2011

मैत्रिण

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण माझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

-संदीप खरे

Sunday, August 28, 2011

तू

गौरगुलाबी चर्येवर
लालकेसरी टिकली टेकलेली...

लालचुटुक ओठांत
गडद गुलाबी गुपिते मिटलेली....

लालगुलाबी वस्त्रांत
सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...

मंद गुलाबी गंधाची
एक देहकुपी लवंडलेली...

सभोवताल्यांशी राखलेलं
एक फिकटं गुलाबी अंतर...

तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;
तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

-संदीप खरे

Wednesday, August 17, 2011

करार

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !

संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !
विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !

मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !

सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !
खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !

मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !
लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !

नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !
जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !

हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !
समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !

एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !
भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !

मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !
तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !

खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !
करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !

Sunday, August 7, 2011

नास्तिक

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा होते निर्माण शक्यता
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थांबलेला एक खरा खुरा नास्तिक
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

-संदीप खरे

Friday, August 5, 2011

दाढी काढून पाहिला

दाढी काढून पाहिला अन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला

मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला

चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला

नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो अन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला

लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला

मी धुके ही पाहिले अन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला

मी पिझा ही चापतो अन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवंथत ठेवला

भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला

मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

-संदीप खरे

Thursday, July 28, 2011

उत्कट-बित्कट होऊ नये

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

-संदीप खरे

Friday, July 22, 2011

दिवानों की बाते है

दिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ?

तेरी गली मे हो आये
होश वही खो जाये
दिख जाये अगर तू पलभर
मैखाने मे जाये कौन ?

गली गली मे फ़िरते है
कई ठोकरें खाते है
जब तुनेही ठुकराया हमे
अब हमको अपनाये कौन ?

-संदीप खरे

Tuesday, July 19, 2011

जुबा तो डरती है

जुबा तो डरती है कहने से
पर दिल जालीम कहता है
उसके दिल में मेरी जगह पर
और ही कोई रहता है

बात तो करता है वोह अब भी
बात कहाँ पर बनती है
आदत से मैं सुनती हूँ
वोह आदत से जो कहता है

दिलमें उसके अनजाने
क्या कुछ चलता रहता है
बात बधाई की होती है
और वोह आखें भरता है

रात को वोह छुपकेसे उठकर
छतपर तारे गिनता है
देख के मेरी इक टुटासा
सपना सोया रहता है

दिलका क्या है,
भर जाये या उठ जाये,
एक ही बात...
जाने या अनजाने
शिशा टूटता है तो टूटता है

-संदीप खरे

Thursday, July 14, 2011

दुपार

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी
जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी
किती जपून ठेवले गुज ओठावर आले
साऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले ?

दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना
मनातली हुरहुर जशी मनात मावेना
माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना
आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना

आता तरी दे ना दे ना मनातले आवताण
मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान
आता येथोनीच थांब नको मनभर होऊ
माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ

हाकेतुन तरी काय ? स्वर पाण्याचा पाण्याचा
तुझे आकाश पाण्याचे . .. माझा डोळाही पाण्याचा
इथे पाणी तिथे पाणी . .. एवढेच ना करणे
उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .

आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन
आणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .

-संदीप खरे

Tuesday, July 12, 2011

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होत
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होत

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होत
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होत

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होत
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

-संदीप खरे

Wednesday, July 6, 2011

आता उरले ना दिस

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

-संदीप खरे

Saturday, July 2, 2011

हृदय फेकले

हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌

हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌

गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर

मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

-संदीप खरे

Friday, July 1, 2011

बॉस

बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदीप खरे

Wednesday, June 29, 2011

ब्लॅंक कॉल

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

-संदीप खरे

Tuesday, June 28, 2011

प्रलय

उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?

मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही

अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत

अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर

अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पोँसर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदणभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल

सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

-संदीप खरे

Sunday, June 26, 2011

जा जा जा दिले मन तुला

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना...देठ पिकल्या फुलांना…देठ पिकल्या फुलांना...
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही…दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन...असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा...पडे त्याच्या हाती दिवा...पडे त्याच्या हाती दिवा...
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही…दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही...वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी...मला एक मन भारी...मला एक मन भारी...
तुला दोन्ही जड नाही...
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही…दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

-संदीप खरे

Saturday, June 25, 2011

झोप

झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

बायको...मुलगी...नातवंडं...पतवंडं...
विझल्या दिव्यातील निद्रिस्त अंधारातून,
काळोखाच्या तळाशी
अंधारल्या खोल्यांतून...माजघरातून...
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

स्ट्रॉमधून कोल्ड्रिंक शोषून घ्यावं
तसे खोल श्वासातून झोप ओढून घेतायत कणाकणांतून...
मिटक्या मारतायत...!
कसलंच भान नसल्याचं किती उत्तान समाधान
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर...
करंडीत रचून ठेवलेल्या स्तब्ध सफरचंदांसारखे
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

कुशीवर...पाठीवर...पोटावर...
उतरत्या झोपेसाठी प्रत्येकाचा वेगवेगळा तळ...!
भरून निघतायत ओल्या सुक्या जखमा, शरीरांच्या झिजा...
तयार होतायत पोटात आपसुकपणे आयुष्याचे रस...अन्न पचतंय...
बाळ मोठी होतायत...केस पिकतायत...हळू...हळू...
रेल्वेच्या एअरकंडीशन्ड डब्यात बसल्यासारखा
किती शांतपणे पार पडतो आहे
अंतापर्यंतच्या प्रवासातला हा निद्रेचा टप्पा...

रोजच्या रोज अनेक अंगांनी छळून छळून घेताना
'टाईम प्लीज' म्हणत स्वत:लाच सूत दिल्यासारखे...
'जगण्याचा आळ नको अन् मेल्याचे दु:ख नको' म्हणत म्हणत
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

-संदीप खरे

Sunday, June 19, 2011

तथास्तू !

सारे करून थकल्यावरती रेंगाळशीलच टाकत श्वास
मागे बघत पाऊलखुणा शोधात राहशील सत्याभास
'इतके चालत आलो आपण? 'म्हणशील चोळत आपले पाय
'वाटेमधले इतके पक्षी, झाडे...त्यांचे झाले काय ?'
त्यांच्यासाठी इतकाच रस्ता, इतकेच अंतर असते जाणे
आपण आपले मानत अस्सल नंतर होतो केविलवाणे !
अंगांगाचा दाहक टाहो, डोळे थिजून होतील थंडी
डोक्यावरती सूर्यास्ताची उजळत असेल झुंबरहंडी
पाखरे उगाच चुकली माकली घरटी शोधात असतील हिंडत
तळे- ते ही गदगदलेले...पायांवरती लाटा सांडत
आणखीन होशील उदास उदास, मनात खोल मावळशील
दगड, डोंगर, झाडे, वाटा....ह्यांच्याइतका साकळशील
तेव्हा दुरून बघणारा मी, हलके हलके देईन हात
रक्तामध्ये फुंकिन वारा...शरिरातील सरकाविन वात
मागता मागता थकून जेव्हा म्हणशील - 'आता नकोच घेणे !'
तेव्हा गुपचूप देऊन टाकेन 'तथास्तू' चे अंतिम देणे !!

-संदीप खरे

Monday, June 13, 2011

वेळ वाईट लागली...

संपले अवघे उत्सव आणि गर्दी पांगली
पालखी आता जिण्याची, बघ रिकामी चालली

ऊन्ह आले मावळू आणिक या दुनियेपरी
-माझियापासून पळते लांब माझी सावली

एवढी वाटे हवीशी ऊब अज्ञानातली
शक्यतांची शक्यताही मग नकोशी वाटली !

कोण हे म्हणते कधि जमली न मज सौदागिरी
अक्षरांतुन वेदना विक्रीस आहे काढली !

दूषणे कोणास द्यावी अन् कशासाठी इथे ?
माणसे होती भली रे...वेळ वाईट लागली !!

-संदीप खरे

Sunday, June 5, 2011

बोलाया काही ना उरले...

खरे तुला सांगू का राणी ? बोलाया काही ना उरले
कलेवरातून शब्दांच्या या प्राणासम हे अर्थ उडाले || धृ ||

क्षणाक्षणाच्या हिंदोळ्यावर
परस्परांचे परिचय घडले
दर्पणात डोकावू जाता
परस्परांचे चेहरे दिसले !
अतिपरिचय हा झाला बहुधा, अन् पाऱ्याचे रंग पुसले || १ ||

होती म्हणु या भेट प्राक्तनी
होते संचित जितुके तोवर...
प्रश्न अता उरलाच कुठे हा
कोण चूक वा कोण बरोबर !
तुजला खात्री कोणाचेही कोणावाचुन कधी न अडले || २ ||

विरंगुळ्यास्तव दु:ख हवे तुज
उत्कटतेची कृत्रिम लाली !
तुझ्या सुशोभित जगण्यासाठी
फुले कागदी चिकार झाली !
सत्य नको स्पर्शाया जाऊ; ते तव कक्षेच्या पलिकडले ! || ३ ||

-संदीप खरे

Sunday, May 29, 2011

आई घरात नसते तेव्हा...

आई घरात नसते तेव्हा, घरात घरच नसते तेव्हा...
सगळे कसे होऊन जाते कोणी 'स्टॅच्यू' म्हटल्यासारखे...
शेल्फवरचे डबे सगळे होऊन जातात शिळे शिळे...
कढई राहते काकडलेली, फ्रिज म्हणतो 'ऊब दे'
टेप म्हणतो 'माझे गाणे मलाच ऐकू येत नाही'
शोकेसमधल्या वस्तू म्हणतात 'एका जागी गंमत नाही'
सगळे दिवे चालू राहतात फॅनसुद्धा राहतो फिरत
गिझर पोटी राहते भीती 'कोण बंद करील परत ?'
सगळे कपडे ओरडतात 'पाणी द्या, इस्त्री द्या'
शर्टवरची कॉलर म्हणते- 'कोणी माझी काळजी घ्या !'
केरसुणी तर खचून जाते, तिची 'धनिण' नसते आता
कोपऱ्यामधल्या कचरापेटीस दिवस दिवस उपास आता
छतावरचा कोळी म्हणतो -'बांधा घर ! गनिम नाही !'
भिंती म्हणतात, आमच्या आतून घर आहे वाटत नाही !'
धूळ म्हणते 'किती दिवस अशी वेळ शोधत होते !'
घरासकट मनावरती थर थर साचत राहते!...
आई घरात नसते तेव्हा...

घरामधल्या शांततेचा आता तडकत जातो पारा
देवापुढल्या समईचा उतरत जातो अवघा तोरा
माझी कविता म्हणते 'आता तुला डोळ्यात ठेवील कोण ?'
जगासाठी पिसा तू, तुला शहाणा म्हणेल कोण ?'

दाटून यावे दात मळभ आणिक पाउस पडूच नये
तसे कोंडत जाते मन आणिक मिळत नसते वारा !
आई नसते तरीही दिसते सगळी माया उभी परसात
एकाकीपण सांगत राहते -'भिंतींना डोळे असतात !''...
                                 ....आई घरात नसते तेव्हा
                                 घरात घरच नसते तेव्हा...

-संदीप खरे

Saturday, May 21, 2011

गाणे न शिकलेले गुलाम अली

गाणे न शिकलेला गुलाम अली
असू शकतो एखादा न्हावीही
कंगव्यात आलेली गिर्‍हाईकाची बट
रूपकच्या सात मात्रात कापून काढणारा,
व एखादा चांभार
झपतालाच्या पाचव्या मात्रेत
खिळा अचूक चपलेत घुसवणारा...

नशिबाने ज्यांचा हात तंबोऱ्यावर पडूच दिला नाही
असे कितीतरी भटकत असतील रानोमाळ
फुत्कारत फिरणाऱ्या नागसापांसारखे

त्यांची गाणी पडतात विखरून
चांदण्यातल्या मालाच्या छातीवर,
रानातल्या फांद्यांवर, नद्यांच्या लाटांवर...
पण त्यांच्याही छातीत असतो
तोच लखलखणारा सोन्याचा गोळा
तेजाळतो आतून
तोच स्वच्छ, ताजातवाना करणारा स्वयंसिद्ध सूर...
आयुष्याच्या अनवट रागात लीलया संचार करणारी
तीच स्वरांची झिंग...

गाणे न शिकलेले गुलाम अली
गात गात धार काढतात तेव्हा पान्हावते कपिला !
वल्ह्याने लाटा कापतात तेव्हा लाटाळते सरिता...!
मुक्त कंठाने चुंबून घेतात टीपेचे स्वर
तेव्हा डोंगररांगांचे माथे 'वाहवा' म्हणत झुकवतात माथे !

गाणे न शिकलेल्या गुलाम अलींचे स्वर विखुरतात पृथ्वीभर
खऱ्याखुऱ्या प्रार्थनेसारखे पोहोचतात अंतराळात...
लळा लावतात चंद्र सूर्य ताऱ्यांना...अगणित आकाशगंगांना...

बेफिकीर असतात गाणे न शिकलेले गुलाम अली
गाणे म्हणजे काय हे कधीच न कळता
गात गात उठतात
गात गात दिवसांच्या ओट्या भरतात
अन् स्वच्छ छातीने आयुष्य अंगावर घेत
गात गात झोपून जातात...

अजूनही सांताक्लॉजसारखा
वर्षानुवर्ष फिरणारा असदुल्लाखा गालिबचा आत्मा
त्यांच्या श्रांत चेहऱ्यावर
हात फिरवत फिरवत गुणगुणतो-
' खाक में क्या सूरते होंगी कि पीनहा हो गई |
सब कहा कुछ लाला ओ गुल में नुमाया हो गई |'

-संदीप खरे

Wednesday, May 11, 2011

तंबोरा

एक तंबोरा होता माझ्याकडे
काळ्या शिसवीचा...चकाकता...
घराण्यात या हातातून त्या हातात वाजत आलेला...
येता जाता कोपऱ्यावर नेहमीच नजर जायची तिथे...

लहानपणी कोणीच हात लावू देत नसे त्याला
पण सांगत कि एक दिवस तुला घ्यायचाय तो हातात...
अन् मलाही होते ठाऊक निश्चित
कि एक दिवस घेणार आहे तो मी हातात...

खूप लक्ष असं दिलंच नाही मी त्याच्याकडे
पण अगदी धूळही बसू दिली नाही त्याच्यावर...
आणि तारा मात्र कटाक्षाने ठेवत आलो सुरात...
कोण जाणे कुठल्या क्षणी मैफिल चालू होईल...
आणि त्या चार तारांवर जन्म लावावा लागेल...!!

बरेच दिवस झाले...बरेच महिने...बरीच वर्षे झाली...
इमारती पडल्या..त्यातील माणसे कोसळली...
ओठांवर प्रौढत्वाची एक काळी लकेर आली...
वेगळ्या प्रकारची पण तारेवरचीच कसरत करत राहिलो...
येता जाता दिसायचा देवघरातल्या नंदादीपासारखा
वाटबघता तंबोरा...त्यावरची खानदानी, हस्तीदंती नक्षी...
हलकेच हात फिरवत म्हणायचो-
'होणार ! एक दिवस मैफिल सुरु होणार...'

घरी आलेले पाहुणेही तंबोरा बघायचे...हळहळायचे...
म्हणायचे- 'आमच्या घरी असा तंबोरा असता तरss...'
- आणि पुढे त्यांच्या कल्पनाच अडायच्या...!!
मी हसायचो...हसायचो फक्त...
तंबोऱ्याच्या जुन्या मैफिलींचा इतिहास सांगताना
त्यांच्यासह माझेही उसळायचे रक्त...

पाहुणे निघून जात...नजरेत ठेवून एक हळहळती सहानुभूती...
मी ही त्यांच्यामागच्या रिकाम्या घरात
छताझुंबरांना साक्ष ठेऊन
गवसणी चढवताना पुटपुटायचो,
होणार...एक दिवस मैफिल सुरु होणार...!!

असे अलगद उगवले मावळले सूर्यचंद्र
कि आठ आठ तासांच्या निजेचे थांबे घेत
कसे झपाटले आयुष्य कळलेच नाही...
फार दिवस खोकला बराच झाला नाही...
तेव्हा सहज वय पहिले...
आणि घाईघाईने येऊन तंबोरा हाती घेतला...
वाटले- याहून कुणी शंकराचे धनुष्य हाती दिले असते
तर बरे झाले असते...!

कोणीच बोलले नाही मग...
ना घर...ना दार...
ना भिंतीवरच्या तसबिरी...ना खालचा गालिचा...
केव्हाच उडून गेलेले असावेत देहातले प्राण
तसा गारठलेला अबोलाच सर्वत्र...सभोवार...
एखादा अटळ...घनगंभीर षड्ज लागून रहावा तसा !
वाट पाहत राहिलेल्या माझ्या शहाणपणाच्या
लक्षात येत गेले हळूहळू
मैफिल कधीच सुरु झाली होती खरं तर...
तंबोऱ्याच्या जन्मापासूनच !!

आता दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात
जिथे अजूनही तंबोरा आहे
तिथे फार क्वचित खेळू देतो मी माझ्या मुलाबाळांना...
धक्का लागून तंबोरा फुटला
तर 'मैफिल चालू व्हायला हवी होती'
इतकेही वाटणार नाही त्यांना...

-संदीप खरे

Monday, April 11, 2011

अन्यथा...

भर दुपारी, भर रस्त्यात, भर गर्दीत
जाणवणारही नाही तुम्हाला त्यांचं अस्तित्व
पण रात्रीच्या निर्जन प्रहरात
एकट्यादुकट्याने रस्त्यावरून फिरताना
अचानक अंगावर येतील ते
दबा धरून बसलेले...
समूहाने धावणारे...
दिसेल तिथे चावणारे !

एकट्यादुकट्यांनो,
तरीही थांबवू नका
अशा काळोख्यावेळीही
रस्त्यावरून फिरण्याचे
अन्यथा
रस्त्याला सवय होऊन जाईल
निर्जन राहायची !!...

-संदीप खरे

Sunday, April 3, 2011

नको करू सखी...

नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार ?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई ?
माझ्या मरणाची उगा उठेल आवई !

कशासाठी घालायचे काजळ डोळ्यांत ?
गर्द डोहावर राणी पसरेल रात!

कशास द्यायची अशी मुखाला लखाकी ?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटीत लपेटू नको काया धुंदफुंद !
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध !

नको करू सखी असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार !

-संदीप खरे

Friday, March 25, 2011

तिला मी बघितले जितुके...

तिला मी बघितले जितुके, कुणीही बघितले नाही
तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही

तिच्या एकाच या स्पर्शातुनी पडल्या विजा लाखो
कसे आश्चर्य की माझे हृदय हे थांबले नाही !

त्यांनी मोजली माझीच पापे न्याय देताना
तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही !!

तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना
तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही !!

कसा सुचतो तिला शृंगार हे मज समजले नाही
कसे सुचले मज गाणे तिला हे उमगले नाही !

कशा व्याख्या तयांना समजवू मी धुंद होण्याच्या ?
तिला प्रत्यक्ष त्यांनी एकदाची पाहिले नाही !!

कसे छळतेच आहे वाक्य ते दोघांशी आम्हा
तिला जे बोललो नाही, तिने जे ऐकले नाही !!

तिच्यासाठी निघाले प्राण, सरले भान जगण्याचे
तिचे काही स्वत:चे एकदाही बिघडले नाही !

तिने चुरडून मेंदी लावली हातास प्रेमाने
तिने आयुष्य माझेही असे का चुरडले नाही ?

मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवली सारी
असा झालो फरारी मी पुन्हा मज पाहिले नाही !!

असा होतीस माझा शब्द तू आत्म्यातला हळवा
तुला मी गिरवले होते; कधिही मिरवले नाही !

-संदीप खरे

Monday, March 14, 2011

मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल

मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल
सुंदर स्वप्ने पडत असतील, पण कुशीवर वळेल...उसासेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

तिच्यासमोरही तेच ढग...जे माझ्यासमोर
तिच्यासमोरही तेच धुके...जे माझ्यासमोर
तिचे माझे स्वल्पविरामही सारखे,अन् पूर्णविरामही !
म्हणून तर मी असा आकंठ जागा असताना
तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

बगिचे लावले आहेत आम्ही एकत्र...एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात आहे माती आम्हा दोघांच्या...अजूनही !
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही !
कधी बोलीच वेगळी लावली...कधी फासेच वेगळे पडले
पण काळ्यापांढऱ्याचा एकच पट उलगडलाय मनात दोघांच्याही !
हजार मैल अंतरावरही एकच गाणे सुरू असेल
एकच लय भिनत असेल...एकाच क्षणी सम पडेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत
दोघांच्याही ओठांवर एकमेकांची भाषा आहे
दोघांच्याही मनभर एकमेकांच्या शुभेच्छा आहेत
दोघांच्याही डोक्यांवर एकमेकांचे आशीर्वाद आहेत...
झोपेच्या कागदावर जाग्रणाच्या अक्षरांनी मी कविता लिहीत असेन !
तिकडे उगाच असह्य होऊन असोशी ती पाणी पीत असेल...
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र; आणि मी जागाच असेन
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत रहावी नदी तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल...

-संदीप खरे

Tuesday, February 22, 2011

काय रे देवा...

आता पुन्हा पाऊस येणार
मग आकाश काळंनिळं होणार
मग मातीला गंध फुटणार
मग मध्येच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार...
काय रे देवा...

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार...
मग मी ती लपवणार...
मग लपवूनही ती कुणाला तरी कळावंसं वाटणार...
मग ते कुणीतरी ओळखणार...
मग मित्र असतील तर रडणार...
नातेवाईक असतील तर चिडणार...
मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार...
आणि या सगळ्याशी तुला काहीच
घेणं-देणं नसणार...काय रे देवा...

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार...
मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार...
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार...
मग साहिरनी लिहिलेलं असणार...
मग ते लतानी गायलेलं असणार...
मग तू ही नेमकं आत्ता हेच गाणं
ऐकत असशील का असा प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार
मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदिल लागणार...
काय रे देवा...

मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार...
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार...
मग खिडकीत घट्ट बांधुन ठेवलेल्या
आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग ५ फूट ५ इंच देह अपुरा अपुरा वाटणार
मग उरी फुटुन जावंसं वाटणार
छाताडातून हृदय काढुन
त्या शुभ्र धारांखाली धरावंसं वाटणार...
मग सारंच कसं मूर्खासारखं
उत्कटं उत्कटं होत जाणार
पण तरीही श्वासांची लय
फक्त कमी-जास्त होत राहणार...
पण बंद नाही पडणार !...
काय रे देवा...

पाउस पडणार
मग हवा हिरवी होणार...
मग पानापानांत हिरवा दाटणार...
मग आपल्या मनाचं पिवळं पान
देठ मोडून हिरव्यात शिरू पाहणार...
पण त्याला ते नाही जमणार...
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार...
मग ते ओशाळणार...
मग पुन्हा शरीराशी परत येणार...
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार
चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार
एसडीचं गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार
रेडियोचा स्लॉट भरलेला असणार...
मग माझ्या जागी मी असणार...तिच्या जागी ती असणार...
कपातलं वादळ गवती चहाच्या चवीने
पोटात निपचित झालेलं असणार.....

पाऊस गेल्या वर्षीही पडला...
पाऊस यंदाही पडतो...
पाऊस पुढल्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...

-संदीप खरे

Sunday, February 20, 2011

वंदन

मज येते सारे एकच मी का सांगू ?
आभाळजिण्याला एकच ढग का मागू ?
ही नक्षत्रे अन तारे पूर्वज माझे
का कवडीकवडीसाठी क्षुल्लक वागू ?

जे जगण्यासाठी करती लाख बहाणे
घालीन तयांना अगदी सुलभ उखाणे
पडलेच कधी ना असल्या प्रश्नांवरती
हसतील तयांचे दिसतील दात दिवाणे !

मी श्वास मोजतो येत्या लाटांवरती
उच्छ्वास म्हणजे मृत समुद्र भरती !
नशिबाच्या लपल्या खडकावरती येथे
फुटतात गलबते स्वप्न कुणी ज्या म्हणती !

मी आर न येथे पार न ऐसा आहे !
जो नको कुणाला असा भरंवसा आहे !
माझ्याविन कुठला डाव कधी न अडला
पडला न कधी मी ऐसा फासा आहे !

मी माझ्यासाठी तणाव खासा आहे !
मी दुसऱ्यांसाठी बनाव खासा आहे !
ना फक्त जगाला, स्वत:सही जो छळतो
मी असला हट्टी स्वभाव खासा आहे !!

या दारी येते रोज चांदणी एक
ती गतजन्मांच्या पुण्याईची लेक !
या भेटीसाठी केवळ तुटक्या फुटक्या
मी घरात माझ्या रोज घालतो खेप !

जळते दुसऱ्यास्तव ते तर चंदन आहे
रडणे आपुल्यास्तव वृथाच क्रंदन आहे
कळलेच कधी ना कोणासाठी जगला
त्या माझ्या जन्मा माझे वंदन आहे !!

-संदीप खरे

Thursday, February 17, 2011

हसलो म्हणजे

‘हसलो’ म्हणजे ‘सुखात आहे’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे ‘दुखले नव्हते’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही !…

‘हसलो’ म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
‘हसलो’ कारण शक्यच नव्हते दुसरे काही
‘डोळ्यामध्ये पाणी नव्हते’ ऐसे नाही !

‘हसलो’ कारण तूच कधि होतिस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
‘हसलो’ कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

‘हसलो’ कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
‘हसलो’ कारण तुलासुद्धा ते खरे वाटते !!
‘हसलो’ म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
‘आतुन आलो होतो डवरून’ ऐसे नाही...

‘हसलो’ कारण विज्ञानाची ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
‘हसलो’ कारण हिशेबास मी दमलो नाही
‘हसलो’ कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

‘हसलो’ कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
‘हसलो’ कारण सत्याची मज भीती नाही
‘हसलो’ कारण फसण्याचा धसका नाही...

-संदीप खरे

Tuesday, February 15, 2011

कसे वाटते...

कसे वाटते सांग मला छळताना ?
मला जाळुनी पुन्हा स्वत: जळताना !

मजा वाटते आणि रागही येतो
शर्यत संपून गेल्यावर पळताना !

तुला पुरावे मिळतील मी असण्याचे
मी नसताना अश्रू ओघळताना !

तुझियावरती पाऊस कोसळताना
आज पाहिले पाणी विरघळताना

एकही नव्हता सोबत गर्दीमधला
वळणापाशी शेवटच्या वळताना !

उल्लू नव्हतो ! स्वत:स रमवत होतो
आस्तिक होऊन मस्तक आदळताना !

नव्या नव्या मज ओव्या सुचती रोज
जुनेच जगणे पुन्हा पुन्हा दळताना !

बघत राहिले जग पेल्यातुन माझ्या
वाफ मामुली विराट वादळताना !

-संदीप खरे

Wednesday, February 9, 2011

नकोस भांडू जगासवे

नकोस भांडू जगासवे अन् नको उगा हट्टाला पेटू
वृधत्त्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू !!

फुलून येईल वृक्ष तोवरी संसाराचा ! कर्तव्यांचा !
सहज जाहला असेल तेव्हा खांद्यावरती सूळ जिण्यांचा !
आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेव्हा गाठू !

बऱ्याच शिल्लक गप्पा, हसणे आणिक रडणे रुसणे देखिल !
स्थळकाळाचे भान पुसोनी केवळ सोबत असणेदेखिल !
सुकले तरीही गंधित ते क्षण संध्येच्या परडीतून वेचू !!

अंतरातल्या चमचमणाऱ्या हीरकणांची कुणास पारख ?
देहच रुचतो आणिक सुचतो ! देहच अस्तित्वाची ओळख !
कसली भीती विरता यौवन ? भरता घागर ? सरता हेतू !...

नको भेट ही आत्ता तरिही, नको पुढिल जन्माचे बोलू
कुणास ठाऊक पुढल्या जन्मी कोण असू अन् केव्हा भेटू ?
जन्म सांगतो, एका जन्मी जळून घे अन् विझून घे तू !

-संदीप खरे

Thursday, February 3, 2011

काय करते ती खुणा

काय करते ती खुणा अन् काय माझ्या कल्पना
काय बोले सत्य आणि काय माझ्या वल्गना !

एकदा ती हासली अन् जन्म झाला सार्थ हा
क्षणभराची नोंद केवळ; युगभराची वंचना !

एवढेही तू नको घेऊ मनावर शब्द हे !
'जा' तुला म्हटलो खरा मी, पण जराशी थांब ना !

त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली
गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना !

क्रूर हे रस्ते तुझे पण मी ही इतका निश्चयी
टोचत्या काट्यांतस माझे पाय देती सांत्वना !

गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना
नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना !

ऐलदेशी, शुष्क रानी पंख मिटला मोर मी
पैलदेशातून थोडे पावसाळे धाड ना !!

-संदीप खरे

Sunday, January 30, 2011

हुतूतू...

एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

जीव जडता देतसे जो जिवलगावर जीवही
ज्या स्तुतीही सारखी अन सारखे आरोपही
झेलतो अन पेलतो जो दीपकाचे तेजही
अन दिव्याखाली जमे तो पोरका काळोखही
मानगर्वापार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळा
लक्षही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोमरोमी जो शहारा पेटतो
तोच वादळ वाटतो अन तो किनारा वाटतो
ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

ताठ मानेने मनाशी जो स्वत:च्या बोलतो !
वाटले ते सांगते अन सांगतो ते वागतो !!
हासताना हसतो अन क्रंदताना क्रंदतो...
जो सजीवतेचे ठसे साऱ्या क्षणांवर ठेवतो...
उत्कटाच्या उन्ह छायेतून घर बांधायचे

शोधते निष्पापता लोचनांचे आरसे
पौर्णिमा ज्या मनातून चंद्र घेऊन जातसे
एकल्या जखमांसवे जो ओळखीचे बोलतो
वाटते तो बोलताना मीच आहे बोलतो
ज्यामुळे हे जगत जाणे सार्थकी वाटायचे

तीर्थ नेत्री दाटताना स्पर्श अस्पर्शापुढे
हात हातातून येत हर शीतळ व्हायचे
जन्ममृत्यूपार जाऊन पोचलो वाटायचे
उत्कटाच्या छायेतून घर बांधायचे
हुतूतू...

अमेरिकेहून ई-पत्र येते तुझे...
उजळत चाललेली असते तुझी पश्चिम
पण तरीही खूप 'मिस' करत असतोस तू
तुझे आई-बाबा, मित्र, इथले रस्ते, इथले कट्टे
अगदी खड्डे, प्रदूषण आणि धुळसुद्धा...

कपाळाला माती लावून
मांडीवर शड्डू ठोकून, रेघ ओलांडून पलीकडच्या पार्टीत गेलास
तेव्हाच चुकचुकलं होतं खरं तर काही मनात
आता ई-पत्र येते अजुनही नियमित तुझे
पण जाणवते की शब्दांचे पाय
घट्ट पकडून ठेवले आहेत कोणीतरी
आणि संपत चालला आहे दमसास...

वाटते की मायन्यापासून शेवटच्या 'टेक केअर' पर्यंत
आता मजकूर लिहीतच नाहीस तू
वाक्य नव्हेत, आठवणी नव्हेत, आश्वासने नव्हेत
पत्रभर एकच शब्द वाचतो मी आजकाल
हु तू तू तू तू तू तू...

-संदीप खरे

Wednesday, January 19, 2011

जरी

मी जन्मांचे राग जरीही मनात साठवतो
आयुष्याच्या पायापाशी नम्रपणे बसतो

जे जे माझे ते जपण्यास्तव 'रोख' ठोक बनतो
जे ना माझे ते स्वप्नांशी उधार मागवतो !

कळून चुकले जेव्हा सारे ऋतु बेईमानी
पाऊस बघता ऊन्ह; उन्हातुन पाऊस आठवतो !

बंद पापणी बघून गेली स्वप्ने माघारी
तेव्हापासून डोळे उघडे ठेवुनिया निजतो !

कुणि भेटा रे खरेच होऊन वाळवंट सत्त्वे
रोज कितीदा मेघ मनातून माझ्या गडगडतो

आयुष्याच्या पायाशी जरि नम्रपणे बसतो
उलटून त्याचे पाय एकदा पाडावे म्हणतो !

-संदीप खरे

Tuesday, January 18, 2011

कल्पना...

या जगण्याच्या जंजाळातुन
कधी कल्पना जाते स्पर्शुन,
कि हा चंद्रम येत बहरून
झोपेच्या दुलईतून ओढून
हट्ट मांडते ती नाजुकसा,
आणि क्षणांचा फुटे आरसा !
त्या बेभानी विलयानंतर
शमवित श्वासांमधली थरथर
रातराणीच्या आवेगातुन
चंद्रखुणांच्या सांद्र स्वरांतुन
हळू आणते ती धरणीवर
उन्मादाचा निपटत गहिवर !
घरातुनी अंगणात ओढून
हळूच नेते मजला खेचुन
समोर माझ्या बैठक मारून
गुडघ्यावरती माझ्या रेलुन
जरा कपाळी आठी घालून
जरा लाजरे हासुन हासुन
हात कापरे हाती घेऊन
शब्द जरा लाडिकसे लेऊन

मला विनवते - '' म्हण ना काही !
कवितेविण गत्यंतर नाही !
मी लाटेसम फुटले होते
अन ताऱ्यासम तुटले होते
मी पुनवेचे उधाण झाले
लुटवून सारे विराण झाले !
भर ना सखया ओंजळ माझी
सावर सखया भोवळ माझी
हलक्या हाते हळव्या वळी
चितार ना कवितेची नक्षी !!''

'' नको हट्ट हा, सखे थांब तू
शब्दांना ठेवून लांब तू
धाप गोड ही उरी असू दे
स्वप्नांहूनही खरी असू दे
असा तुझ्या असण्याचा दर्वळ
शब्दांना अर्थांची भोवळ !
नकोस मागू आता काही
देणाऱ्याला भानच नाही !
देणाराही...घेणाराही
अंतर आता उरले नाही !
उद्या सकाळी प्रकाश येईल
सारे हळवे घेऊन जाईल
दवासारखे उत्कट सारे
उद्या व्हायचे उन्हबावरे !
नकोच म्हणुनि काही मागू
पद्यातून गद्यासम वागू !

हट्ट नको आता शब्दांचा
क्षण हा मौनाच्या ओठांचा !
क्षण असला भाग्याने मिळतो
आयुष्याच्या सोबत जळतो
दिवा लागता या हृदयांशी
नको उधारी कवितेपाशी !
असेच मजला मूक राहू दे
जरी चूक हे; चूक राहू दे
पहाट राहो अशीच ही की
कवितेच्या बाहूत कवी मी !!
( अस्वस्थाचे अंतर्नाद उत्कटाच्या उन्हवेळा...)

-संदीप खरे