Wednesday, January 19, 2011

जरी

मी जन्मांचे राग जरीही मनात साठवतो
आयुष्याच्या पायापाशी नम्रपणे बसतो

जे जे माझे ते जपण्यास्तव 'रोख' ठोक बनतो
जे ना माझे ते स्वप्नांशी उधार मागवतो !

कळून चुकले जेव्हा सारे ऋतु बेईमानी
पाऊस बघता ऊन्ह; उन्हातुन पाऊस आठवतो !

बंद पापणी बघून गेली स्वप्ने माघारी
तेव्हापासून डोळे उघडे ठेवुनिया निजतो !

कुणि भेटा रे खरेच होऊन वाळवंट सत्त्वे
रोज कितीदा मेघ मनातून माझ्या गडगडतो

आयुष्याच्या पायाशी जरि नम्रपणे बसतो
उलटून त्याचे पाय एकदा पाडावे म्हणतो !

-संदीप खरे

No comments:

Post a Comment