नाव…गाव…घर…
मी रमलोय खरा… पण हे माझं गाव नव्हे…
आणि मी सांगत फिरतो ना… ते माझं नाव नव्हे…
बदलायचंच आहे हे सारं…
माझ्या नावाच्या बॉक्समध्ये कसं पडत नाही एखादंही पत्र ?
का फक्त मीच लिहायचंय जीव तोडून… घुसमट सोसत ?
गाव गाठायचंय जिथे पत्ता नसूनही माझ्या दारात पडतील बोलकी पत्र…
आणि नावाचं काय…
सापडेलच चांगलंसं… फ्लॉवरपॉटमध्ये खोचलेलं
जोवर आतून फुलत नाही एखादी बाग
तोवर एवढ्यावरच भागवू !
हा कुलुपाआतला चौकोन
म्हणजे माझं घर नव्हे काही,
मी आपला असतो इथे दिवसरात्र;
अष्टौप्रहर भोगून काढतो
खाणं, झोपणं, टी. व्ही., गाणं…
……थू तिच्यायला !
पावसाळ्या रात्री ह्या चौकोनाच्या भोवती
बेडकांची रांगच्या रांग डराव डराव करते ना;
तेव्हा वाटतं… आता हे
माझ्यानंतर ह्या भिंतीत राहतील
माझी जायची वाट बघतात साले (?)
…………… माझ्याइतकीच (?)
कदाचित पुढच्या पावसाळ्यात
जेव्हा गोड पाण्याबरोबर
चार दोन खारट थेंब टपटपणार नाहीत त्यांच्या त्वचेवर
तेव्हा समजेल त्यांना
रिकामा पिंजरा
रावा उडोनि गेला !
इकडे बघ… हे बघ…
ते दूर डोंगरांच्या पलिकडे
जे न दिसणारं आहे ना
तिथे एक दगडी, शालिन, मऊ, जिवंत घर आहे
वाऱ्याच्या मापाचं… वारेमाप !
तिथे… तिथे जाणार मी…
सॉलिड ना…
जाणार… बदलणार… असं म्हणत म्हणत तसंच रहाणं….
थू तिच्यायला……
माझ्या गावात मध्यभागी मनोऱ्यावर
एक मोठं घड्याळ आहे
माझ्या घरातसुद्धा कवायत करणाऱ्या
दोन हातांचा गोल डबा आहे…
त्याच्या तालावर
मी माझं नाव, गाव, घर आणि कंटाळा
शिवाशिवी खेळतात…
बदलणारंच आहे मी हे सारं…
नाव, गाव, घर……
थू तिच्यायला……
पहाट झाली का ?… झाली झाली….
'जाग' आली का ?… आली आली….
निघायचं का ?… निघा निघा….
कुलूप घ्या…किल्ली घ्या…कड्या लावा….
आता कशाला ? कशाला ?
थू तिच्यायला……
-संदीप खरे
Saturday, June 15, 2013
Thursday, June 13, 2013
तेवढे तरी राहू दे
मी काय तुला मागावे, अन काय तू मला द्यावे
छे सखी निराशा कसली मागणीच नव्हती कसली
ती हीच हीच ती जागा अन ती हीच हीच ती वेळा
मी ग्रीष्म उभा जळणारा डोळ्यात तुझ्या घन गोळा
जा भिजवून सारी माती मृद्गंध मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…
ती सर्व स्वागते वाया प्राक्तनात नव्हती माया
मी स्पर्शही केला नाही तरी कशी आक्रसे काया
जा उत्तर घेऊन याचे अन प्रश्न मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…
तू चंद्रच होतीस अवघी मज म्हणून भरती
आली वाळूत काढली नावे लाटांत वाहून गेली
जा घेऊन जा ही भरती ती लाट मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…
-संदीप खरे
छे सखी निराशा कसली मागणीच नव्हती कसली
ती हीच हीच ती जागा अन ती हीच हीच ती वेळा
मी ग्रीष्म उभा जळणारा डोळ्यात तुझ्या घन गोळा
जा भिजवून सारी माती मृद्गंध मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…
ती सर्व स्वागते वाया प्राक्तनात नव्हती माया
मी स्पर्शही केला नाही तरी कशी आक्रसे काया
जा उत्तर घेऊन याचे अन प्रश्न मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…
तू चंद्रच होतीस अवघी मज म्हणून भरती
आली वाळूत काढली नावे लाटांत वाहून गेली
जा घेऊन जा ही भरती ती लाट मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…
-संदीप खरे
Sunday, January 13, 2013
शिवण
तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच आपण
एखादेचसे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱ्याचदा रडता रडता ओठी येते
साधारणत: असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते...
आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठ्या आणि चारदोन थेंब ?
असले गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...
रस्त्यावरून वाहणाऱ्यांच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतळ्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...
तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले ?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपणसुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे
कवितांची आवड वेगळे....आणिक कविता करणे वेगळे !!
कवितादेखील असतेच कोण ? वाळूत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो' - याच्याशिवाय उरतेच काय ?
तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते
एकदा शिवण चुकली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...
-संदीप खरे
एखादेचसे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱ्याचदा रडता रडता ओठी येते
साधारणत: असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते...
आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठ्या आणि चारदोन थेंब ?
असले गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...
रस्त्यावरून वाहणाऱ्यांच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतळ्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...
तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले ?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपणसुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे
कवितांची आवड वेगळे....आणिक कविता करणे वेगळे !!
कवितादेखील असतेच कोण ? वाळूत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो' - याच्याशिवाय उरतेच काय ?
तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते
एकदा शिवण चुकली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...
-संदीप खरे
Wednesday, January 2, 2013
तुझी पापणी
सहजच उठते तुझी पापणी
सहजच झुकते खाली अलगद
आणि आम्ही इथे बिचारे
एका नजरेमध्ये गारद !
पापणीत या फडफडणारी
खुळ्या जीवांची फुलपाखरे
वयात येती सूर्यकिरण ते
तुझ्या पापणीत थरथरती जे !
तुझी पापणी दिवसरात्रीच्या
मैफिलीतला पंचम गहिरा
लवलवता ती या हृदयाची
सतार होते दिडदा दिडदा
तुझ्या पापणीतून अडकली
'हो-नाही' ची अनवट कोडी
मिटून उघडे क्षणार्धात त्या
आमुच्यासाठी युगे थबकती !
तुझी पापणी हळवी, अल्लद
तरी आम्हाला भलता धाक
तुझी पापणी चुकवून देतो
नकळे कितीदा तुलाच हाक
सहजच आता उघड पापणी
सहजच सुटू दे आमचे प्राण
काय एकदा निकाल लागो
दिगंत होवो अंतर्धान !!
-संदीप खरे
सहजच झुकते खाली अलगद
आणि आम्ही इथे बिचारे
एका नजरेमध्ये गारद !
पापणीत या फडफडणारी
खुळ्या जीवांची फुलपाखरे
वयात येती सूर्यकिरण ते
तुझ्या पापणीत थरथरती जे !
तुझी पापणी दिवसरात्रीच्या
मैफिलीतला पंचम गहिरा
लवलवता ती या हृदयाची
सतार होते दिडदा दिडदा
तुझ्या पापणीतून अडकली
'हो-नाही' ची अनवट कोडी
मिटून उघडे क्षणार्धात त्या
आमुच्यासाठी युगे थबकती !
तुझी पापणी हळवी, अल्लद
तरी आम्हाला भलता धाक
तुझी पापणी चुकवून देतो
नकळे कितीदा तुलाच हाक
सहजच आता उघड पापणी
सहजच सुटू दे आमचे प्राण
काय एकदा निकाल लागो
दिगंत होवो अंतर्धान !!
-संदीप खरे
Sunday, December 23, 2012
पाऊस
गोष्ट सुरु होईल तेव्हा सुरु झाला पाहिजे.....
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे....
गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे...
नायिकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघांमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यांमधून
सर सर सांडला पाहिजे...
सुखदु:खाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना...
मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस !
'हा कधी आला?' म्हणावे हसून...
मागे रेलून...डोळे मिटून....
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
- तर तिथेही...पाऊस !...
-संदीप खरे
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे....
गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे...
नायिकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघांमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यांमधून
सर सर सांडला पाहिजे...
सुखदु:खाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना...
मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस !
'हा कधी आला?' म्हणावे हसून...
मागे रेलून...डोळे मिटून....
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
- तर तिथेही...पाऊस !...
-संदीप खरे
Wednesday, December 19, 2012
पौगंड
मग मी त्यादिवशी भलताSSच विचार केला
'हे भलतेच !' असं म्हणालीच आई !
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही !!...
पाण्याबरोबर वाहत आलो होतो मीही
पण ते कळलेच नव्हते आत्तापर्यंत
पंधरा-सोळा वर्षांची एकसंध बेशुद्धी;
आणि जागतो तो पाणी पोहोचलेच गळ्यापर्यंत !
पहाटे एकदा अचानक घुमू लागली बासरी
ऐकलेच नव्हते असे आत्तापर्यंत काही...
आणि अर्धवट झोपेतच...आठवले उगाचच...
बरेच दिवसांत आजोबांनी कुशीत घेतले नाही....
आठवले; पण तसे वाटले नाही काहीच
देहभर फडफडत होती एक नवीन कोरी वही
...'वर्गातली टप्पोर्या डोळ्यांची मुलगी'...
म्हटलं हं 'आवडते एवढंच...बाकी काही नाही...'
'जगाचे काय ?' असेही वाटले...
'माझे काय?' हे त्याहून जास्त !
आरशातून तरंगायचे देहभर डोळे...
वादळी...प्रसन्न...क्षणार्धात सुस्त...
दरीत संध्याकाळ मावळताना
ऐकली होती दरीभर सांडलेली सनई
वाटले होते- 'हेच जगणे !.....
झालो मोठे....थोरसुद्धा होऊ.....'
खूप वर्ष झाली आता...अजून सनईसुद्धा आवडते;
पण उसळत नाही आतून काहीच...
वाटते- नुसतेच बसून राहू....
पण भलताच विचार केला होता एकदा...
माझ्यामते तर जगावेगळा...
'हे भलतेच' असे म्हणालीही होती आई...
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही.......
-संदीप खरे
'हे भलतेच !' असं म्हणालीच आई !
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही !!...
पाण्याबरोबर वाहत आलो होतो मीही
पण ते कळलेच नव्हते आत्तापर्यंत
पंधरा-सोळा वर्षांची एकसंध बेशुद्धी;
आणि जागतो तो पाणी पोहोचलेच गळ्यापर्यंत !
पहाटे एकदा अचानक घुमू लागली बासरी
ऐकलेच नव्हते असे आत्तापर्यंत काही...
आणि अर्धवट झोपेतच...आठवले उगाचच...
बरेच दिवसांत आजोबांनी कुशीत घेतले नाही....
आठवले; पण तसे वाटले नाही काहीच
देहभर फडफडत होती एक नवीन कोरी वही
...'वर्गातली टप्पोर्या डोळ्यांची मुलगी'...
म्हटलं हं 'आवडते एवढंच...बाकी काही नाही...'
'जगाचे काय ?' असेही वाटले...
'माझे काय?' हे त्याहून जास्त !
आरशातून तरंगायचे देहभर डोळे...
वादळी...प्रसन्न...क्षणार्धात सुस्त...
दरीत संध्याकाळ मावळताना
ऐकली होती दरीभर सांडलेली सनई
वाटले होते- 'हेच जगणे !.....
झालो मोठे....थोरसुद्धा होऊ.....'
खूप वर्ष झाली आता...अजून सनईसुद्धा आवडते;
पण उसळत नाही आतून काहीच...
वाटते- नुसतेच बसून राहू....
पण भलताच विचार केला होता एकदा...
माझ्यामते तर जगावेगळा...
'हे भलतेच' असे म्हणालीही होती आई...
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही.......
-संदीप खरे
Sunday, December 2, 2012
मित्र
मित्र म्हणायचा - "त्या पेनानेच लिही फक्त
जे झिडकारून, भीक म्हणून टाकेल अंगावर कोणी !
त्या पेनाच्या जिभेतच सापडतील तुला
फक्त पूर्णविराम बाकी अशी संपूर्ण गाणी..."
मित्र म्हणायचा - "अन लिही हवे तसे
जसे की लिहायचेच नव्हते तुला कधी काही
सहीपाशी भेटले दु:ख, तर म्हण हे माझेच लिहिणे
भेटले लोचट सुख तर म्हण- छे ! मी लिहिलेच नाही !!"
मित्र म्हणायचा - "प्रेमात पड पौर्णिमेला
अमावस्येशी टिकले तर चमत्कार म्हण !
मदाऱ्याच्या माकडासारखा सोपस्कार म्हणून
आतून राहत सुटा सुटा 'नमस्कार' म्हण !"
मित्र म्हणायचा - "सुंदर काय, कुरूप काय दोन्ही त्वचांखाली
वाहत असते तेच लाल, शिळे, नियमित रक्त
सेक्सी-बिक्सी म्हणतोस ज्याला, ते ही असते पार्थाSS
देवाघरचे एक सुंदर पॅकेजिंग फक्त !"
"इस्त्री करून अंगावरती कपडे ल्यावेत कडक
याहून नसते जगात काही दुसरे हसण्यासारखे !
भीक मागते पोर...त्याचे काळभोर डोळे
जगात नसते याहून काही दुसरे दुखण्यासारखे !!"
"पाऊस असतो स्वप्न केवळ, माती असते स्वभाव
खड्डे असतात रस्त्यांवरचे पाऊसकालीन अभाव !
इच्छा असतात रंगांसारख्या, सरड्यासारखे मन
जगणे असते निर्बुद्धाची कुंपणापाशी धाव !!"
मित्र म्हणायचा- "सांग एक मित्र होता कधी
पृथ्वीला डायनॉसॉरची स्वप्ने पडण्याआधी !
अमिबाच्या पेशीसारखा एकटा, सहज तरी
फाटत फाटत अनेक व्हायची भाळी होती व्याधी !!"
-संदीप खरे
जे झिडकारून, भीक म्हणून टाकेल अंगावर कोणी !
त्या पेनाच्या जिभेतच सापडतील तुला
फक्त पूर्णविराम बाकी अशी संपूर्ण गाणी..."
मित्र म्हणायचा - "अन लिही हवे तसे
जसे की लिहायचेच नव्हते तुला कधी काही
सहीपाशी भेटले दु:ख, तर म्हण हे माझेच लिहिणे
भेटले लोचट सुख तर म्हण- छे ! मी लिहिलेच नाही !!"
मित्र म्हणायचा - "प्रेमात पड पौर्णिमेला
अमावस्येशी टिकले तर चमत्कार म्हण !
मदाऱ्याच्या माकडासारखा सोपस्कार म्हणून
आतून राहत सुटा सुटा 'नमस्कार' म्हण !"
मित्र म्हणायचा - "सुंदर काय, कुरूप काय दोन्ही त्वचांखाली
वाहत असते तेच लाल, शिळे, नियमित रक्त
सेक्सी-बिक्सी म्हणतोस ज्याला, ते ही असते पार्थाSS
देवाघरचे एक सुंदर पॅकेजिंग फक्त !"
"इस्त्री करून अंगावरती कपडे ल्यावेत कडक
याहून नसते जगात काही दुसरे हसण्यासारखे !
भीक मागते पोर...त्याचे काळभोर डोळे
जगात नसते याहून काही दुसरे दुखण्यासारखे !!"
"पाऊस असतो स्वप्न केवळ, माती असते स्वभाव
खड्डे असतात रस्त्यांवरचे पाऊसकालीन अभाव !
इच्छा असतात रंगांसारख्या, सरड्यासारखे मन
जगणे असते निर्बुद्धाची कुंपणापाशी धाव !!"
मित्र म्हणायचा- "सांग एक मित्र होता कधी
पृथ्वीला डायनॉसॉरची स्वप्ने पडण्याआधी !
अमिबाच्या पेशीसारखा एकटा, सहज तरी
फाटत फाटत अनेक व्हायची भाळी होती व्याधी !!"
-संदीप खरे