Saturday, March 20, 2010

खात्री

मला बोलायची कसलीच घाई नाही….
कारण माझा शब्द यथावकाश
पोहोचणारच आहे तुमच्या पर्यंत
या ना त्या वळणापाशी…!

अतीव आनंदाच्या, अतीव दु:खाच्या
अतीव निराशेच्या, अतीव रागाच्या,
अतीव करुणेच्या, अतीव प्रेमाच्या…
..किंबहुना कुठल्या ही आत्यंतिक
भावनेच्या चाळणीतून खालपर्यंत
उतरलेला तुमचा शब्द…
खरं तर माझाच असेल…!!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment