Thursday, February 11, 2010

कधी हे बोलले मला

सुधर सुधर…
चल ए काम कर ए
ओ भाऊ नो एण्ट्री दिसली का?
सुधार सुधार…
काही तरी कर आता
ए…अरे अस कुठे असत का?
एकदा सांगितल ना…आत्ता नाही

कधी हे बोलले मला
कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
वाटचे वाटचे सार्‍या दिशाचे दिशाचे
सार्‍या जीवाचे पाखरू गेले आभाळी शोधत माझ्या

ए..एकदा संगितल ना आता नाही म्हणून
धरेची ओढ मला
नभाचे गूढ मला
कधी ना चालल्या गेल्या
वाटचे भेटणे मला
ढगाळ हवेत घेत पाऊस कवेत
नेते उधाळ पाऊल जीव रानभर दूर माझा
गारवा हा वर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्या साठी वेगळा पाऊस माझा
वेगळे वाटणे असे वेगळे सांगणे असे
जीवातला सूर थेट ओठावर येई माझ्या

कशास कशास केले नियम बियम सारे
आखीव रेखीव रूप मनाला असते कधी
कधी मोकळ्या वार्‍याचे कधी भरते पाण्याचे
कधी हातात घेऊन कधी दूरुन पहिले कधी
वार्‍याचे झर्‍यास जसे चंदन सूर्यास जसे
माझिया मनास जसे कोंडताना येई मला
आखल्या वाटानी कधी बांधल्या ओठांनी
कधी तेच तेच गात गाणे
जमलेच नाही मला

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

No comments:

Post a Comment